शिक्षणासाठी फळे विकण्यापासून ते एका इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक - एक प्रेरणादायी प्रवास. Success Story in Marathi.



हणमंतराव रामदास गायकवाड
जन्म : २१ ऑक्टोबर १९७२
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक : BVG India Limited.

हणमंतराव गायकवाड यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या एका छोट्याश्या गावामध्ये  21 ऑक्टोबर 1972 रोजी झाला.  त्यांचे वडील कोर्टामध्ये क्लार्कचे काम करीत असत. हणमंतराव लहानपणापासून खूप अभ्यासू होते. त्यांना गणित विषयामध्ये खूप रुची होती. त्यांना चौथीला 15 रुपये दर महिना स्कॉलरशिप मिळायची. सहावी पर्यंत त्यांच्या घरामध्ये वीज देखील नव्हती. ते आणि त्यांचा मोठा भाऊ दत्तात्रय ( जे आता डॉक्टर आहेत ) कंदिलाच्या प्रकाशावर अभयास करत असत.

ते सहावीत असताना त्याचे कुटुंब पुण्यात फुगेवाडी येथे स्थलांतरित झाले. तिथे त्यांचे कुटुंब 8 X 9 फुटाच्या एका छोट्याश्या खोलीत राहात होते. पुण्यामध्ये त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करत दहावी मध्ये 88% गुण प्राप्त केले. त्यांना त्यांच्या आवडीच्या  गणित विषयात 150 पैकी 148 गुण मिळाले होते. 



शाळेत असताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. त्यांचे वडील आजारी होते. त्यांच्या आईला त्यांचे दागिने विकावे लागले होते. त्यामुळे त्यांची आई आणि ते दोघे मिळून घर चालवायचे. शाळेत असताना त्यांनी आंबे व इतर फळे विकण्याचे पण काम केले आहे. 

दहावी नंतर हणमंतराव ज्या शाळेत होते त्या शाळेतल्या हेड मास्तरांनी हनुमंतरावांच्या आईला त्यांना डिप्लोमा करण्यास सुचविले. त्यानुसार त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन पुणे ( Government Polytechnic Pune ) येथे इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रवेश घेतला.

हणमंतराव डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर ते फिलिप्स कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून जॉब करू लागले. पण तिथे ते जास्त काळ रमले नाहीत.

त्यांनी पुढे अजून शिकायचे ठरवले. त्यांच्या आईने पंधरा हजाराचे कर्ज काढून त्यांचे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि ( Vishwakarma Institute of Technology ) येथे बी टेक ( BTech ) ला ऍडमिशन घेतेले.

BTech चे शिक्षण घेत असताना हणमंतरावांनी त्यांच्या एका मित्रा सोबत मिळून शिकवणी घेण्यास सुरुवात केली. त्यातून त्या दोघांना महिन्याचे 3200 रुपये मिळायचे. त्यातले निम्मे निम्मे दोघेजण वाटून घ्यायचे. त्याच बरोबर ते एका कंपनीसाठी एजन्ट म्हणून पण काम करत होते. त्यातून त्यांना महिन्याला 2300 रुपये मिळायचे. असे करून ते आपल्या राहण्या खाण्याची व शिक्षणासाठी लागणाऱ्या पैश्यांची सोय स्वतःच करत असत.

त्यानंतर त्यांनी रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते चार पाच कामगार गोळा करत आणि त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेत असत. अश्या प्रकारे त्यांना एका घरा मागे साधारणपणे चार ते पाच हारांचा फायदा व्हायचा. अश्या प्रकारे त्यांना या कामातून महिन्याला 10 ते 12 हजार रुपये मिळू लागले होते. आता हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. त्यानंतर त्यांनी सांगवी मध्ये 2 गुंठे जागा घेतली.

कॉलेजमध्ये शिकत  असताना स्वामी विवेकानंदांच्या विचाराने हणमंतराव प्रभावित झाले. यातूनच त्यांनी भारत विकास प्रतिष्ठाण (Non Profit). या प्रतिष्ठाण ची स्थापना करण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश हा होता कि या ग्रुप च्या माध्यमातून निधी गोळा करून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे. त्यानंतर लवकरच प्रतिष्ठाणने कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळावा ह्यासाठी प्रयत्न सुरु केले.



B Tech पूर्ण केल्यानंतर ते Telco ( आत्ताचे नाव Tata Motors ) ह्या कंपनीमध्ये  Trainee या पदावर जॉईन केली. तिथे काम करत असताना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून कंपनीतले जुने सामानाचा उपयोग करून कंपनीचा साधारण २ कोठी रुपयाचा फायदा करून दिला. या कामगिरीमुळे त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर खूप खुश झाले आणि त्यांनी हनुमंतरावांना, तुम्हाला काय बक्षीस हवे आहे असे विचारले. यावर हणमंतराव म्हणाले माझ्या गावातील बरीच लोकं बेरोजगार आहेत, त्यांची आपण आपल्या कंपनी मध्ये हाऊस कीपिंग साठी नेमणूक करावी.

त्यावर त्यांचा  वरिष्ठांनी त्यांना सांगितले कि कंपनीच्या नियमाप्रमाणे ते काम आपण फक्त एखाद्या ट्रस्ट किंवा संस्थेलाच देऊ शकतो. तेंव्हा हणमंतरावांनी त्यांना त्यांच्या भारत प्रतिष्ठाण संस्था ची माहिती दिली. आणि त्या संस्थेमार्फत त्यांना ते काम मिळाले. हे त्यांच्या प्रतिष्ठाणला मिळालेले पहिले काम होते. ह्या कामासाठी त्यांनी 8 लोकांना नोकरीची संधी दिली.

त्यांचे हे काम बघून Tata Motors ने त्यांना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट चे हाऊस कीपिंगचे आणि बागकामाचे कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यांच्या कामाची पद्धत आणि निष्ठा बघून हळूहळू त्यांना Tata Motors मधल्या सगळ्या डिपार्टमेंट चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच त्यांच्या कामाची कीर्ती दूरवर पसरत गेली आणि इतर बऱ्याच कंपन्यांनीहि त्यांना काम देण्यास सुरुवात केली.



त्यानंतर 1997 मध्ये हणमंतराव गायकवाड यांनी त्यांच्या BVG India Limited कंपनीची सुरुवात केली. आणि पहिल्याच वर्षी 8 लाख रुपयांचा फायदा मिळवला. तसेच दुसऱ्या वर्षी त्यांच्या कंपनीला 56 लाख रुपयांचा फायदा झाला. आणि दर वर्षी त्यांची प्रगती होत गेली.

1999 साली हनमंतरावांचे लग्न झाले आणि त्यांनी Telco कंपनीला राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ त्यांनी आपल्या कंपनीसाठी काम करायचे ठरवले. हळूहळू त्यांची आणि त्यांच्या कंपनीची महती दूरवर पसरत गेली आणि त्यांना भारतातील बऱ्याच शहरातल्या मोठमोठ्या कंपनींचे व संस्थांचे काम मिळू लागले.

2003 पर्यंत त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 4 कोठीच्या घरात पोहचली. त्यांना खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले होते. त्यांना संसद भावनांचे यांत्रिकीकृत पद्धतीने स्वछता करण्याचे काम मिळाले. संसद भावना नंतर मुख्यमंत्री निवास आणि मग राष्ट्रपती भवन यांचेही कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले.

आज त्यांच्या क्लायंटच्या लिस्ट मध्ये खूप मोठमोठी नवे आहेत जसे महिंद्रा, फॉक्सवोगन, बजाज, फियाट, अशोक लेलँड तसेच ONGC, हिंदुस्थान लिव्हर, ITC, Accenture आणि भारतीय रेल्वे

आठ कर्मचारी, जे त्यांच्या गावातल्या त्यांच्या मित्रांपासून सुरुवात केलेली कंपनी हळूहळू यशाचे शिखर चढत गेली आणि आज देशातल्या 20 पेक्षा जास्त राज्यात ते त्यांची सेवा देत आहेत. फक्त देशातच न्हवे तर आज या क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपनींबरोबर भागिटारीत करत देशाबाहेर 700 हुन अधिक ग्राहक आहेत आणि आज ही कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठी आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य पुरवणारी कंपनी आहे.

एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरावर असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेतात. त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे. ते त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांना आपला परिवार मानतात.

सन 2027 पर्यंत देशातील 10 लाखाहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य हणमंतरावांचे असून आता बीव्हीजी इंडियाचे मूल्यांकन 1000 कोटींपेक्षा जास्त आहे.

कोणतेही मार्गदर्शन किंवा पाठबळ नसताना, हणमंत रामदास गायकवाड यांनी आपल्या परिश्रमाने आणि समर्पणातून एवढे मोठे साम्राज्य उभे केले. त्यांचा हा प्रवास आपल्याला नक्कीच प्रेरणा देतो. 

You may also like

काय तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून आहात ? मग हे नक्की वाचा.

10 Low Investment Business Ideas in Marathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये

How to make money on Youtube (Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात)

Things to remember before starting a Youtube Channel : (Youtube Channel सुरु करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.)

What is Real Estate and How to Start Real Estate Business रिअल इस्टेट उद्योग काय आहे, महत्व, आणि तो सुरु करून त्यात सफलता कशी मिळवायची.

13 Ways to Earn Online Money in Marathi : या १३ Online माध्यमातून तुम्ही घरीबसल्या चांगले पैसे कमावू शकता

टिप्पण्या